आतापर्यंत 4 हजार 397 प्रकरणे; एका दिवसात सर्वाधिक 600 रुग्णांची वाढ

नवी दिल्ली. देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4 हजार 397 झाली आहे. रविवारी सर्वाधिक 605 प्रकरणे समोर आली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 150हून अधिक, आंध्रप्रदेशात 34, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशात 14, हिमाचलमध्ये 7, राजस्थानात 6, पंजाबमध्ये 3, कर्नाटक-ओडिशा मध्ये 2-2 आणि झारखंडमध्ये 1 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत संक्रमितांची संख्या 4 हजार 67 झाली आहे. यातील 291 बरे झाले असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


तबलिगी जमात प्रकरणाने संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात तबलिगी जमात प्रकरण उघडकीस आल्यानंतर संसर्ग प्रकरणांची गती जवळपास दुप्पट झाली आहे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, तबलिगी जमातीचे प्रकरण झाले नसते तर देशात 7.4 दिवसांत प्रकरणे दुप्पट झाली असती मात्र आता ही संख्या 4.2 दिवसांत दुप्पट होत आहे. ते म्हणाले की, रविवारी देशातील 274 जिल्ह्यांतून कोरोनाचे नवीन प्रकरणे समोर आले होते. बुधवारपासून ज्या ठिकाणी संसर्ग होण्याच्या अधिक घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे.


Popular posts
कोरोना विषाणुपासुन बचावासाठी संपुर्ण शहरात जगजागृती करा- शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे
पिंपरी चिंचवडची चिंता वाढली! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या गेली नऊवर
मुंबई :‘महाराष्ट्रात संचार बंदी जमावबंदी लागू’ देशात थैमान घातलेल्या कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 सोमवारपासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या राज्यात 31मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन असणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय ? लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. कोरोनामुळे सध्या चीन, स्पेन आणि इटलीमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊन केल्यानंतरच सुधारली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांनी बंधनकारक आहे. लॉक डॉऊनमध्ये लोकांना घरे सोडता येत नाहीत. तसेच 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमाव करून थांबता येत नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना बाहेर पडण्याची परवानगी असते. यामुळे केले जाते लॉक डाऊन लॉक डाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन केले जाते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून महाराष्ट्रात यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेन बंद कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र, आता केंद्राने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
पिंपरी चिंचवड येथील तीन जण झाले करोनामुक्त ;आज मिळणार डिस्चार्ज
निजामुद्दीन मधून आलेले दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह