आतापर्यंत 4 हजार 397 प्रकरणे; एका दिवसात सर्वाधिक 600 रुग्णांची वाढ
नवी दिल्ली.  देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4 हजार 397 झाली आहे. रविवारी सर्वाधिक 605 प्रकरणे समोर आली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 150हून अधिक, आंध्रप्रदेशात 34, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशात 14, हिमाचलमध्ये 7, राजस्थानात 6, पंजाबमध्ये 3, कर्नाटक-ओडिशा मध्ये 2-2 आणि झारखंडमध्ये 1 रुग्…
पिंपरी चिंचवडची चिंता वाढली! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या गेली नऊवर
पिंपरी : कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत फक्त 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती . ते बारा ठणठणीत बरे होतात न होतात आता शहरात नव्याने सहा कोरोनाग्रस्त रूग्णां पाॅझिटिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आता शहरात करोनाग…
पिंपरी चिंचवड येथील तीन जण झाले करोनामुक्त ;आज मिळणार डिस्चार्ज
पिंपरी :- राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशभरातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. यात समाधानाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित म्हणून नोंद झालेल्या तीन रूग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांची आता करोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने ते व्हायरस फ्री झाल…
निजामुद्दीन मधून आलेले दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ जण होते. त्यानंतर शोधाशोध करून २२ जणांना क्वारंटाइन करण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाला यश आले. यांच्यातील काही जणांचा रिपोर्ट आला असून यात दोन जण पॉझिटिव्ह तर ६ जण निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.…
कोरोना विषाणुपासुन बचावासाठी संपुर्ण शहरात जगजागृती करा- शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे
पिंपरी : संपुर्ण जगभरात थैमान घातलेला नोव्हेल करोना विषाणु ( Novel corona virus 2019 – nCov ) सध्या भारतात वेगाने पसरत आहे व हया आजाराची लागण आता पुण्यामध्ये देखील काही नागरिकांना झाली असल्याचे प्रसार माध्यमांमधून समजत आहे. मा. आयुक्त साहेब, मा. वैद्यकिय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी आपल्या विभागा…
मुंबई :‘महाराष्ट्रात संचार बंदी जमावबंदी लागू’ देशात थैमान घातलेल्या कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 सोमवारपासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या राज्यात 31मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन असणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय ? लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. कोरोनामुळे सध्या चीन, स्पेन आणि इटलीमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊन केल्यानंतरच सुधारली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांनी बंधनकारक आहे. लॉक डॉऊनमध्ये लोकांना घरे सोडता येत नाहीत. तसेच 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमाव करून थांबता येत नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना बाहेर पडण्याची परवानगी असते. यामुळे केले जाते लॉक डाऊन लॉक डाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन केले जाते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून महाराष्ट्रात यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेन बंद कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र, आता केंद्राने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
पिंपरी : विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेल…